रुग्ण हक्क परिषदेने ” कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान ” २०२५- २०२९ ही पाच वर्ष कॅन्सर रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी समर्पित केलेली आहेत. समाजातील कॅन्सरने घातलेले थैमान त्यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च मोफत करण्यासाठीच कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत महागडे उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख उमेश चव्हाण यांनी दिली.